पुणे : पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्या मंत्र्यांनी हजेरी लावली होती.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी महाविकास आघाडी सोडून महायुती सरकारमध्ये प्रवेश केला होता. या घटनेला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे नेते एकाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले असले, तरी त्यांनी एकमेकांशी संवाद टाळला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी, शरद पवार आणि अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले. या कार्यक्रमात त्यांच्या आसन व्यवस्थेची रचना एकमेकांच्या शेजारी करण्यात आली होती. मात्र, अजित पवार व्यासपीठावर येताच त्यांनी पहिल्यांदा आसन व्यवस्था बदलली आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी शरद पवार यांच्या शेजारी ठेवली. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळल्याचे दिसून आलं.
या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. अजितदादांनी आसन व्यवस्थेत केलेल्या बदलामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा आणि त्यांच्या गटांमधील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्याच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दोन्ही नेते कोणती भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा २६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शरद पवार पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात, तर अजित पवार बालेवाडी येथील स्टेडियममध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना काका-पुतण्याचे एकत्रित फोटो; पुण्यातील बॅनरची तुफान चर्चा
-‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?
-मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
-काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड
-पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव