पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडणारी आणखी एक घटना पुणे शहरातून समोर आली. राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाने त्यांच्या दोन्ही सुनांचा हुंड्यासाठी छळ केल्याचे समोर आले. हगवणेंनी मोठ्या सुनेला बेदम मारहाण केली. तर धाकट्या सुनेला मारहाण करत तिचा छळ केला त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी संतोष देशमुख यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी करत त्यांच्या मुलगा धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आहे. पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुःखद घटनेवरुन देशमुखांनी कस्पटे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देण्याबाबत चर्चा केली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
आमचं दु:ख आणि त्यांचं दु:ख काही वेगळं नाही. घरातील एखादा माणूस सोडून गेला तर तो भोग कोणाच्या नशिबी येऊ नये. कस्पटे कुटुंबियांना हे लेकरु सांभाळण्यासाठी, पुढे वाटचाल करण्यासाठी, तसेच या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वराने बळ दिलं पाहिजे, हीच आमच प्रार्थना. आपली माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. या नराधमांनी आपली माणसं ठेवली नाहीत. मात्र, खरी परिक्षा इथून पुढे आहे. न्यायालयाच्या पायरीवर जाताना आपण सगळं सिद्ध करणं आहे. त्यातूनच न्यायाची अपेक्षा करणं आहे. हे करुन न्याय मिळत नसेल तर अहिंसेच्या मार्गाने योग्य दिशा शोधणं गरजेचं आहे. घरी बसून आपल्याला मिळत नाही. रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतं. काय पाप केलं होतं माझ्या भावाने, वैष्णवी ताईने की, त्यांना कुटुंबांना सोडून जावं लागलं. न्यायासाठी लढावंच लागेल, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
भरपावसात बीडमधून पुण्यात आलेल्या देशमुख कुटुंबियांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करत त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार दिला. या वेळी धनंजय, वैभवी आणि राजश्री देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांचे मुलगा विराज देशमुखही उपस्थित होता. या भेटीतून एकमेकांच्या दुःखात साथ देण्याचा आणि अन्यायाविरुद्ध एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त झाला.
हत्वाच्या बातम्या
-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात सायबर क्राईम वाढला; आमदार हेमंत रासनेंकडून ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी
-नीलम गोऱ्हेंनी घेतली वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट; म्हणाल्या, ‘महिला आयोगाच्या सदस्यांची…’
-‘निवडणूक आल्या की कोरोना कुठून तरी बाहेर निघतोय’; वसंत मोरेंना नेमकं काय म्हणायचं?