पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील आळंदी शहराजवळील प्रस्तावित विकास आराखड्यात कत्तलखान्याकरिता आरक्षण ठेवण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि वारकरी संप्रदायातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत कत्तलखाना होऊ न देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतच्या आरक्षण वगळण्याच्या आदेश मी दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना, “मी कर्जमाफी बाबत सविस्तर मी सांगितले आहे.कधी करायचे,सरकार शब्द फिरवत नाही,योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. सगळं होईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.पावसामुळे वाढलेल्या धरण साठ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत, कधी विसर्ग सोडायचा कधी कमी करायचा, याबाबत बाजूच्या राज्यांशी देखील आमचे बोलणे सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला
-ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी
-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
-भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?
-नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ