पुणे : सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेचे उद्घाटन पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी नवोदित गायकांना प्रेरणा देताना म्हटले की, गायकांनी कालानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत. “आज ‘करा ओके’ युगातही सोमेश्वर फाऊंडेशनने वाद्यवृंदासह गायनाची संधी उपलब्ध करून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. नवोदित गायकांनी या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रपती पदक विजेती गायिका सावनी रवींद्र, सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सनी विनायक निम्हण, स्वातीताई निम्हण, नंदकुमार वाळुंज, बिपिन मोदी, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.
पं. अजय पुढे म्हणाले, “ज्याप्रमाणे जुन्या घरांची जागा उंच इमारतींनी घेतली, तशीच गायनातही बदल होत आहेत. हे बदल कलाकारांनी स्वीकारावेत. स्पर्धकांनी श्रवणाला महत्त्व द्यावे, कारण त्यातूनच चांगला गायक घडतो. आयुष्यात स्पर्धा दुय्यम असते, प्रामाणिकपणे गाणे गात राहा,” असा सल्ला त्यांनी दिला.
सावनी रवींद्र म्हणाल्या, “एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते, पण सातत्य राखणे कठीण. सोमेश्वर फाऊंडेशनने हे करून दाखवले. लहानपणापासून या व्यासपीठावर येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली.” सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “अन्न, वस्त्र, निवारा यासह कला, क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जोपासला तरच समृद्ध जीवनशैली निर्माण होते. गेली २३ वर्षे पुणे आयडॉलच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत.”
एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते मात्र त्यामध्ये सातत्य टिकवणे अत्यंत अवघड काम असते. सोमेश्वर फाऊंडेशनने ते काम करून दाखवले आहे. लहानपणापासून या व्यासपीठावर येण्याची इच्छा होती, आज इथे येता आले हे मी माझे भाग्य समजते.
प्रास्ताविकपर भाषणात सनी विनायक निम्हण म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसा जोपासला तर एक समृद्ध जीवनशैली तयार होते अशी सोमेश्वर फाऊंडेशनची भावना आहे. यामुळेच आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, समृद्ध जीवनशैलीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल महत्वाची असते. त्या अनुषंगाने काम करत मागील 23 वर्षांपासून पुणे आयडॉल च्या माध्यमातून काम करत आहोत.
पुणे आयडॉल स्पर्धा चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, 24 मे 2025 रोजी दु. 12 ते 3 यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. तसेच या दिवशी बक्षीस समारंभ कार्यक्रमानंतर जितेंद्र भूरुक प्रस्तुत ‘गीतों का सफर’ या सांगीतिक कार्यक्रमाने स्पर्धेची सांगता होणार आहे.
अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षण गायक जितेंद्र भुरुक आणि मुग्धा वैशंपायन करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी केले तर उमेश वाघ यांनी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
-एरव्ही पिक्चरमध्ये बोल्ड सीन आला की बंदी घालणाऱ्या चाकणकर…; शालिनी ठाकरें आक्रमक, नेमकं काय प्रकरण?
-पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई
-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित