अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातातील एक अत्यंत हृदयद्रावक अशा घटना समोर आली आहे. लंडनहून आपल्या पत्नीच्या अस्थी घेऊन आलेले अर्जुनभाई या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. केवळ सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये त्यांची पत्नी काळाच्या पडद्याआड गेली होती. तिची शेवटची इच्छा होती की, तिच्या अस्थी तिच्या मूळगावी-अमरेली जिल्ह्यातील एका गावात-फुल नदीत विसर्जित कराव्यात.
पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनभाई भारतात आले होते. त्यांनी पत्नीच्या अस्थी फुल नदीत भावपूर्ण श्रद्धांजलीसह विसर्जित केल्या. त्यानंतर परतिच्या वाटेने लंडनला जाण्यासाठी निघाले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. विमान अपघातात अर्जुनभाईंचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. अर्जुनभाई आणि त्यांच्या पत्नीमागे दोन चिमुरडी मुलं- एक ८ वर्षांची आणि दुसरी ४ वर्षांची अशा दोघी लहानग्या मुली आता अनाथ झाल्या आहेत. या चिमुरड्यांनी केवळ आठवड्याभरात आई-वडील दोघांनाही गमावलं आहे.
या अपघातात अनेक अशा भावनिक कथा समोर येत आहेत, ज्या ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणत आहेत. प्रत्येक कुटुंबाची एक शोकांतिका आहे, एक वेदनादायक गोष्ट आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या विमान अपघातात एका अर्जुन भाईचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
-अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका
-अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…
-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?
-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान
-फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी