पुणे : सासरच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेन आपले आयुष्य संपवले. या प्रकरणात तिचा नवरा शशांक हगवणे, सासू, सासरे आणि इतर दोघांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरच्या मंडळींच्या पोलिस चौकशीतून या प्रकरणाचे अनेक धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.
वैष्णवी आणि शशांक यांचे प्रेमसंबंध होते. दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन २८ एप्रिल २०२३ रोजी सूसगाव येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर वैष्णवीवर सासरच्यांनी सातत्याने मानसिक आणि आर्थिक दबाव टाकायला सुरुवात केली. हुंड्याची मागणी, शिवीगाळ, धमकी, आणि छळ या गोष्टींमुळे वैष्णवी तणावात होती.
वैष्णवीच्यान वडिलांनी लग्नाआधी हगवणे कुटुंबाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना या कुटुंबाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला दुसऱ्या स्थळाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शशांकने त्या प्रयत्नांना विरोध करत पाहणीस आलेल्या दोन मुलांना धमक्या दिल्या. “मी आणि वैष्णवी लग्न करणार आहोत, तुम्ही मध्ये पडू नका,” असा इशारा शशांकने दिला होता.
वैष्णवीच्या वडिलांची मालमत्ता आणि मिळू शकणारा संभाव्य हुंडा पाहून हगवणे कुटुंबाने हा विवाह मंजूर केला होता, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नानंतर तिच्यावर वाढत्या जाचामुळे ती तणावाखाली गेली आणि अखेर स्वतःचे आयुष्य संपवले केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?
-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”
-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?