पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. ‘प्राज’चे संस्थापक आणि इथेनॉल मॅन डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित असलेल्या ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी वाढत्या प्लास्टिकच्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘बदलती जीवनशैली आणि वाढते तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचे संकट हे सध्या मोठे आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज आहे’, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
‘प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यामुळे तयार होणाऱ्या कार्बनमुळेदेखील भविष्यकाळात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संशोधन करतानाही पर्यावरणाचे संरक्षण कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘प्राज’ कंपनीने हेच आपल्या कामातून दाखवून दिले आहे.’, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
‘उद्योजक म्हणून काम करताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच उद्योगात नुकसान झाल्यानंतर डगमगून न जाता त्यावर केलेली मात याची माहिती डॉ. चौधरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यांच्या लेखनाचा उपयोग तरुण पिढीला आणि उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना होईल,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘प्राज’चे अध्यक्ष अतुल मुळे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विशाल सोनी व्यासपीठावर उपस्थित होते. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
महत्वाच्या बातम्या
-८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या
-पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक
-चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
-पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?
-…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत