पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली होती. राज्य निवडणूक आयोगाने देखील प्रभाग रचनेसंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ४ आठवड्याच्या अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली करुन निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरु केली असून प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ४ महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर
-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?