पुणे : पुण्यात एका महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडल्याचे समोर आली आहे. हातउसने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून महिलेसोबत मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका रिक्षा चालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. श्यामली कमलेश सरकार (४०, रा.सूर्य उज्ज्वल हाइट्स, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. आरोपी आणि मृत महिला यांच्यात आर्थिक व्यवहारामुळे वाद झाला होता, ज्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी) आणि श्यामली सरकार हे एकमेकांना ओळखत होते. श्यामली ही बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत देहविक्री करायची आणि पंडित तिला दररोज रिक्षातून तिथे सोडायचा. श्यामलीने पंडितकडून ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादातूनच पंडितने रागाच्या भरात तिचा खून केला.
ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वादावादीनंतर पंडितने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिथून पळ काढला. त्यानंतर रात्री तो स्वतःहून नांदेड सिटी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले, जिथे त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला
-पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…
-राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू