अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे विमान लंडनच्या दिशेने निघाले होते आणि त्यात २४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोळ दिसत असून, या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले होते, परंतु काही वेळातच हा अपघात घडला.
एअर इंडियाचं हे विमान मेघानीनगर येथील रहिवासी भागात घडला असून, विमान कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान बोइंग ड्रीमलाइनर ७८७ असून, त्याची प्रवासी क्षमता आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि बचाव पथके तातडीने पोहोचली असून, बचावकार्य सुरू आहे. मेघानीनगर परिसर हा विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे, आणि विमान कोसळल्याने आसपासच्या रहिवासी भागातही नुकसान झाल्याची शक्यता आहे. स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोळ पसरले. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या दुर्घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरातील रस्ते बंद करून बचावकार्याला गती दिली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?
-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान
-फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी
-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?
-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?