पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सासरच्या जाचाला आणि हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला आत्महत्या करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडेच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पुण्यासारख्या शहरातही हुंड्यासाठी मुलीला आत्महत्या करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात हुंड्याविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“येत्या जुलैपासून पुढील एक वर्ष शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांनी मिळून हुंडाविरोधी मोहीम जोमाने राबवली पाहिजे. लग्नात जाण्यापूर्वी हुंड्याची मागणी किंवा देणं-घेणं झाले आहे का, याची खात्री करावी आणि असेल तर अशा लग्नांना उपस्थित राहू नये, असे त्यांनी सुचवले. त्या पुढे म्हणाल्या की, हगवणे कुटुंबाशी त्यांचे पाच दशकांचे कौटुंबिक संबंध होते, तरीही सुशिक्षित कुटुंबात मुलीला माहेरहून गाडी, मोबाइल यांसारख्या वस्तू आणण्यासाठी दबाव टाकला गेला. यावर त्या म्हणाल्या, जर मुलीला मोबाइलवर बोलायचे असेल तर तिने स्वतःच्या हिमतीवर तो घ्यावा, अशा मानसिकतेत बदलाची गरज आहे.
“8 मार्चला महिला दिन असतो, पण 22 जूनला आम्ही हा कार्यक्रम करत असतो, देशात पहिल्यांदा याच दिवशी महिला धोरण राबविण्यात आले होते, निर्णय प्रक्रियेत त्या आल्या होत्या. सायबर क्राइम हा त्या वेळी विषय नव्हता,आता मोबाईलमुळे महिलांच्या बाबतीत अनेक क्राइम वाढले आहेत. यात सायबर क्राईम हा मुद्दा वाढवला. आता DBT चे पैसे थेट महिलांच्या खात्यात येतात आधी ते नव्हते”
लाडकी बहीण योजनेमुळे पैसे मिळाले चांगलं आहे, पण सामाजिक परिवर्तन झाले का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सरकारवर टीका करत नाही, पण महिलांच्या आयुष्यात काय मोठा यामुळे बदल झाला. 2100 रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात, वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला. सरकार माध्यमातून अनेक निधी दिले महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना व्यवसाय देऊन त्यांच्या मालाला मार्केट पण दिलं पाहिजे, इच्छाशक्ती आणि सामाजिक परिवर्तन फक्त निवडणुकीपुरतं नको, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात धक्कादायक प्रकार; मौत्रिणसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला खाकीचा धाक दाखवला अन्…
-पुण्यात व्यावसायिकाने संपवले जीवन, धक्कादायक कारण आले पुढे
-हिंदी भाषा सक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस
-‘जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी’; पुण्यातील हा मुस्लिम करतोय वारकऱ्यांची सेवा
-पुण्यातील धक्कादायक प्रकार; दारु प्यायचा म्हणून कामावरुन काढून टाकलं, त्याचाच राग मनात धरला अन्…