पुणे : बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २ दोन लग्न केल्यानंतर पुन्हा तिसऱ्या लग्नाचा घाट घातला होता. सुलेमान पठाण या नावाच्या व्यक्तीचे आधीच २ लग्न झालेले असताना एका अल्पवयीन मुलीशी तिसऱ्यादा लग्न करण्याच्या तयारीत होता. सुलेमानच्या पहिल्या पत्नीला याची माहिती मिळाताच त्याने मंडपातून पळ काढला आणि दुसऱ्या व्यक्तीला बोहल्यावर चढवले. सुलेमानने आपल्या बहिणीच्या गावातील आसिफ शेख याला लग्नाच्या जागी उभे केले आणि स्वतः फरार झाला. या प्रकरणात सुलेमानविरुद्ध आधीच अटक वॉरंट जारी होते, कारण त्याचा पहिल्या पत्नीसोबत वाद न्यायप्रविष्ट आहे.
या बालविवाहाची माहिती पोलिसांना मिळाली, पण तोपर्यंत आरोपी आणि इतरांनी घटनास्थळ सोडले होते. पोलिसांनी फिल्मी शैलीत गाडीचा पाठलाग करत सुलेमानसह इतरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली काझीसह २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुलेमानच्या या कृत्याने परिसरात खळबळ उडाली असून, बालविवाहासारख्या गंभीर समस्येवर प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका संतापजनक घटनेने सर्वांना हादरवले. सोनाली बैत (३७) नावाच्या तरुणीने तिच्या प्रियकर महेश पांडे (२७) याच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची, शंकर रामचंद्र कांबळे (५८), हत्या केली. सोनालीच्या अनैतिक संबंधांना वडिलांनी विरोध केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
या दोन्ही घटना समाजातील नैतिक आणि कायदेशीर मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. बीडमधील बालविवाह आणि मुंबईतील क्रूर हत्याकांड यामुळे कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकतेची गरज अधोरेखित होते. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात
-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू