पुणे : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी महत्वाची ठरलेली योजना म्हणजे ‘माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना अर्थिक लाभ दिले जात आहेत. प्रतिमहिना १५०० रुपये दिले जात असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी, शर्ती घातल्या होत्या. मात्र ज्या महिला गरजू नसताना देखील त्यांनी या योजनेलाचा लाभ गेल्या कित्येक महिने घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलताना आज स्पष्टच सांगितलं आहे.
‘आम्ही ही योजना आली त्यावेळी आमच्याकडे फार कमी वेळ होता. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होते. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल’, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्याच्या तिजोरीवर आधीच मोठा बोजा असतानाही राज्य सरकारकडून ही योजना राबवली जात आहे. त्यातच ज्यांना गरज नाही अशांनी देखील या योजनेच्या माध्यमातून पैसे घेतले तर राज्याच्या तिजोरीवर आणखी भार वाढत आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून १५०० रुपयांऐवजी आता २१०० रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या वक्तव्यावरुन काही सत्ताधारी नेत्यांनी यु-टर्न घेतल्याचे पहायला मिळाले. तर दुसरीकडे त्रुटी आढळलेल्या महिलांना आता या योजना लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?
-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?
-वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून