पुणे : पुण्यातील हिंजवडीमध्ये सुमारे २७० छोट्या-मोठ्या आयटी कंपन्या असून, रोज ४ ते ५ लाख कर्मचारी ये-जा करतात. या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रस्त्यांवरील पाण्यामुळे २ ते ३ तास अधिकचा वेळ प्रवासात घालवावा लागतो. यामुळे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण उत्पादकतेवरही परिणाम होतो. स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचारी यामुळे वैतागले असून, प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंजवडी हे जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला आता पावसाळ्यात “वॉटर पार्क” अशी नको ती ओळख मिळत आहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्ते पाण्याखाली जातात, वाहने तरंगताना दिसतात, आणि प्रवासाचा वेळ वाढतो. याला कारणीभूत आहे प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि नियोजनाचा अभाव. नैसर्गिक नाले बुजवणे, ड्रेनेज व्यवस्थेची अपुरी खोली, आणि मेट्रोच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह अडकणे यासारख्या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
महापालिकेला आयटी कंपन्यांकडून दरवर्षी १ लाख ८० हजार कोटी रुपयांचा कर मिळतो, तरीही मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन कमी पडत आहे. नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम, राडारोड्यामुळे नाले बुजणे, आणि अडथळ्यांमुळे पाण्याचा निचरा न होणे यामुळे हिंजवडीचे रूपांतर पावसाळ्यात वॉटर पार्कमध्ये होते. यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण न झाल्यास आयटी कंपन्या “वर्क फ्रॉम होम”चे धोरण कायमस्वरूपी लागू करतील का, असा प्रश्न आयटी अभियंत्यांच्या संघटनांनी उपस्थित केला आहे. हिंजवडीला पुन्हा आयटी पार्क म्हणून अभिमानास्पद ओळख मिळवून देण्यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणा पुढाकार घेतील का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.
महत्वाच्या बातम्या
-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात
-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू