पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी हगवणे कुटुंबातील सर्व व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर आणि हगवणे कुटुंबाची थोरली सून मयुरी जगताप हगवणे यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्य महिला आयोगावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. यानंतर आता महिला आयोगाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील महिलांच्या न्यायाचं ठिकाण असणाऱ्या महिला आयोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून सामान्य माणसं जेव्हा लेकींच्या तक्रारी महिला आयोगाकडे करताना संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नंबरच बंद लागत असल्याचे धक्कादायक चित्र आता समोर आले आहे. त्यामुळे आता पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. तसेच महिला आयोगावर कारवाई तर दूरच पण निदान नंबर सुरु करण्याची मागणी केली आहे.
महिला आयोगाचे संपर्क क्रमांक (022) 26592707, हेल्पलाईन नंबर 155209 दोन्ही नंबर डझ नॉट एक्झिस्ट असल्याचे सांगत आहेत. यावरुन मनसेने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र लिहले आहे.
पुणे मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाकडे दिनांक 26 मे रोजी महिला अत्याचाराची तक्रार घेऊन पीडित महिलेचे नातेवाईक आले होते. या संदर्भात आम्ही महिला आयोगाचा फोन लावल्यावर कोणताही फोन लागला नाही. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही महिलेस कौटुंबीक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैगिक किंवा मानसिक त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड अशा कोणत्याही घटनेत अन्यायग्रस्त महिलांना तक्रारी करायच्या असतील तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29व्या वर्धापन दिनी मोठा गाजावाजा करीत टोल फ्री नंबर 155209 याची घोषणा केली. परंतु आज तो नंबर बंद असल्याने राज्यातील अत्याचारीत महिलांना उपयोग होत नसल्याची धक्कादायक परिस्थितीची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील कार्यालयाचा फोन नंबर (022-26592707 /26590739) पण बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबद्ध असल्याची फक्त पोकळ घोषणाच असून वास्तव्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारास वाचा फुटणारच नाही. अशीच सरकारी यंत्रणा असल्याचा खेद वाटतो. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा फोन लावला असता तो पण बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यातील या सुस्त निष्किय सरकारी यंत्रणेवर महाराष्ट्रातील महिला कश्या काय अवलंबून राहू शकतात? याचे गंभीर वासव्य समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?
-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”