पुणे : खासदार सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात दाखल झाली तेव्हा त्यांनी पालखीचे स्वागत केले. यापूर्वी त्यांनी वारकऱ्यांना रेनकोट वाटप केले आणि समाज आरतीला हजेरी लावली. “प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
आषाढी वारीची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले होते. याच संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.
“बारामतीमध्ये वारकऱ्यांची रेलचेल आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बारामतीतील मंडळी वारकऱ्यांची सेवा करत आहेत. मी संत गोरा कुंभाराच्या मातीत जन्मलेली आहे. वारकरी सांप्रदायाची माझी नाळ लहानपणापासूनच जोडली गेली आहे. या सर्व गोष्टींचे मला वेध लागलेले असतात. बारामतीत पालखीच्या आगमनाचा सर्वत्र आनंद असतो, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
“आषाढी वारीच्या पुजेच्या मानासंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊलीकडे मागणं मागण्याचा अधिकार आहे. माऊलीला पूर्ण करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील अशी मला आशा आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक
-मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?
-तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा
-मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल
-पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी