पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे कुठे कधी आणि काय घडेल सांगू शकत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातील घटना काही सेकंदातच घरबसल्या मिळतात. मात्र हा सोशल मीडिया जितका फायदेशीर तितकाच धोकादायक असल्याचं अनेक घटनांवरुन स्पष्ट होतं. सोशल मीडियाचा वापर कधी जीवावरही बेतू शकतो, कर्नाटकमधून अशीच एक घटना आता समोर येत आहे. सोशल मीडियावरील ओळख महिलेच्या चांगलीच जीवावर बेतली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका महिलेची ओळख एका तरुणाशी झाली. ते एकमेकांशी चॅटींग करु लागले, मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अवघ्या एक आठवड्यातच दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले. प्रेमात पडलेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्याचे ठरवले. रविवारी दोघेही एकमेकांना भेटले. त्यानंतर महिलेसोबत झालेल्या प्रकारने सर्वांनाच धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रिती (वय ३५) या कर्नाटकमधील रहिवासी होत्या. प्रिती यांची सोशल मीडियावर पुनीत नावाच्या व्यक्तीशी झाली. एका आठवड्यात एकमेकांच्या प्रेमात पडलेले प्रिती आणि पुनीत रविवारी एकमेकांना भेटले. त्यानंतर पुनीतने प्रिती यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. प्रितीने यासाठी नकार दिला आणि पुनीतचा राग अनावर झाला. पुनीतने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह शेतात पुरला होता. तोपर्यंत मृत महिलेच्या पतीने सोमवारी हसनमधील पोलिसांकडे प्रिती बेपत्ता असल्याच तक्रार नोंदवली होती.
आरोपी पुनीत हा मंड्या जिल्ह्यातील केआर पेटा येथील करोती गावचा पुनीत आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास केला आणि मंड्या येथील एका गावातील शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंड्या पोलिस अधीक्षकांनी ही दिलेल्या माहितीनुसार पुनीत आणि प्रिया चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भेटले होते. रविवारी दोघांची भेट झाली आणि शारीरिक संबंधावरून वाद झाल्याने पुनीतने प्रितीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे आणि यादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पुनीत आणि प्रीती रविवारी मंड्या म्हैसूरला गेले होते. त्यानंतर केआर पेटाच्या कट्टारघट्टा वनक्षेत्रात दोघांमध्ये भांडण झाले आणि पुनीतने प्रितीची हत्या केलीर. पुनीतने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तिचा मृतदेह करोती गावातील त्याच्या शेतात पुरला. पोलिसांनी प्रथम महिलेचे मोबाईल नेटवर्क ट्रेस केले आणि तेव्हापासून ती कुठे फिरत होती हे शोधून काढले. त्यानंतर पुनीतला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान प्रिती आणि पुनीतचे चॅट आणि फोन कॉल्सच्या बद्दल चौकशी केली असता त्याने सर्व गुन्हा कबुल केला.
त्यामुळे समाजात वावरत असताना काळाबरोबर चालण्यासाठी समाज माध्यमांचा वापर जरुर करावा पण त्याचा अतिरेक किंवा गैरवापर झाला तर अशा घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी सोशल मीडियाचा सोसल इतकाच वापर करावा हे नक्की…
महत्वाच्या बातम्या
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती
-‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग
-अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’
-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक
-मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?