पुणे : जामखेडमध्ये ९ मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर १३ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला सागर मोहोळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोळीबारात त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या, त्यापैकी एक गोळी तोंडातही लागली होती. जवळून केलेल्या या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेनंतर सागरला तातडीने पुण्यात हलवण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने अभिमन्यू या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासात गोळीबार करणारे पुण्यातील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.
सागर मोहोळकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका जत्रेदरम्यान घडली होती. त्यानंतर सागर मोहोळकर चांगलाच चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावरील गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता.
या गोळीबारामुळे जामखेड आणि परिसरात खळबळ उडाली असून, गुंडगिरी आणि वैयक्तिक वैराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सागर मोहोळकरच्या मृत्यूने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता गॅस सिलेंडर मिळणार पण फक्त OTP वरच! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश
-पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य
-दहावी पेपरफुटी प्रकरणात ट्विस्ट; ६०० रुपये घेऊन फसवणूक, १८ वर्षीय चैतन्य शेंडेला अटक
-मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!














