पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागा आणि एका जागेवरील पोटनिवडणूक अशा एकूण १० जागांसाठी होणारी निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरून सस्पेन्स निर्माण केला होता, मात्र आवश्यक १० आमदारांच्या सूचक सह्या नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत. कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार न उतरवून रिस्क घेणे टाळल्यामुळे अखेर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडणुकीत पक्षीय बलाबल आणि संख्याबळानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ६ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) २ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ जागेवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट) यांनी आपला १ उमेदवार मैदानात उतरवला आहे. अशा प्रकारे १० जागांसाठी केवळ १० अधिकृत अर्ज शिल्लक राहिल्याने आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
कोणतीही चुरस किंवा घोडेबाजार न होता ही निवडणूक पार पडल्याने सर्वच पक्षांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आपल्या संख्याबळाच्या मर्यादेत राहून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदानाची गरज उरलेली नाही. आता हे नऊ उमेदवार आणि पोटनिवडणुकीतील एक उमेदवार विधान परिषदेचे नवनवीन सदस्य म्हणून लवकरच शपथ घेतील. या बिनविरोध निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तरी ‘समंजसपणा’चे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भाजपचे उमेदवार –
१) सुनील कर्जतकर
२) माधवी नाईक
३) संजय भेंडे
४) विवेक कोल्हे
५) प्रमोद जठार
६) प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदेंचे उमेदवार –
१) नीलम गोऱ्हे
२) बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट –
१) झिशान सिद्दीकी
शिवसेना ठाकरे गट –
१) अंबादास दानवे
महत्वाच्या बातम्या-
-शिवाजी कोण होता? पुस्तकावर बंदी घालावी! छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांची मागणी
-मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना दोघांना मारहाण, पुणे पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं अन् उतरवला माज
-टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस














