पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या मॉडल कॉलनी येथील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचे वसतिगृह खासगी विकासकाला देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. याबद्दल आता ट्रस्टकडून खुलासा करण्यात आला असून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहे. ट्रस्टने अशा व्हायरल बातम्या किंवा पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. दिगंबर जैन समाजासाठी दीर्घकाळ करण्यात आलेल्या या वसतीगृह भविष्यात कसं असणार, हे देखील चकोर गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले चकोर गांधी?
पुण्यामध्ये राहण्यास येणाऱ्या जैन समाजातील मुलांसाठी 1962- 63 च्या सुमारास हे वसतिगृह बांधण्यात आले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत एकाच कुटुंबाचे सदस्य या ट्रस्टचे अध्यक्ष होते. आमच्या तीन पिढ्यांनी या ट्रस्टमध्ये योगदान दिले आहे, आणि मी स्वतः गेल्या 45 वर्षांपासून येथे कार्यरत आहे. या वसतिगृहात राहून अनेक विद्यार्थी आज त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत. हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून, यात कोणत्याही व्यक्तीच्या देणग्या नाहीत. तरीही, ही जागा समाजाची मालमत्ता नाही, परंतु समाजाला याचा लाभ झाला आहे. हे कार्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं आहे, असं चकोर गांधी म्हणाले आहेत.
वसतिगृहाची इमारत 62-65 वर्षे जुनी असून ती सध्या जीर्ण झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासाची योजना आखली जात आहे. चकोर गांधी यांनी सांगितले की, मंदिर जसेच्या तसे ठेवून वसतिगृहाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल. पुणे आणि उपनगरांच्या वाढत्या विकासामुळे आणखी दोन-तीन वसतिगृहांची गरज आहे. ट्रस्टकडे येणाऱ्या निधीचा उपयोग यासाठी केला जाईल, असे आश्वासन देखील गांधी यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश
-फडणवीसांचे पुणे दौरे वाढले, शरद पवारांना देणार मोठा धक्का; बड्या नेत्याचा मुलगा लागला गळाला?
-बावनकुळेंनी मोडला 35 वर्षांचा नियम, नागपुरातून थेट पुणे गाठलं अन् आबा बागुलांनी लक्ष्य साधलं!
-पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण उघड; विमानतळावरुन कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त














