पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देश सोडून पळून गेला. यावरुन पुण्यासह राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटत आहेत. अशातच निलेशची आई कुसुम घायवळ यांनी घायवळ कुटुंबाची बाजू समोर आणण्यासाठी उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले आहे. आता निलेश घायवळच्या आईने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राजकारण्यांवर टीका केली आहे. त्याचबरोबर पोलिसांवरती देखील आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या कुसुम घायवळ?
‘माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं’, असंही कुसुम घायवळ म्हणाल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील सोनेगावच्या जिल्हा परिषदतून निलेश उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं वार काढू दिलं जात नव्हतं, त्यामुळे त्याला त्रास दिला जात होता, असंही कुसुम घायवळ म्हणाल्या आहे.
‘दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, असंही कुसुम घायवळ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दिव्याखाली अंधार! गुंडगिरीवरून भाजपकडे बोट; त्याच धंगेकरांचा चिरंजीव कुख्यात गुंडासोबत
-“मी ‘तो’ निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला”, गुंड निलेश घायवळबाबत गृहराज्यमंत्री कदमांची प्रतिक्रिया
-वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी
-पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत
-पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद














