पुणे : चाकणच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ताफ्यासह पाहणी दौरा केला. या वाहतूक कोंडीला आता चाकणकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीवरुन आता चाकणकरांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ‘अजितदादांनी एकदा विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून करुन दाखवावा’, असं आव्हान आंदोलनकर्त्यांनी थेट अजित पवारांना दिलं आहे.
चाकणकरांच्या या आंदोलनामध्ये खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील सामील झाल्याचे पहायला मिळाले. स्थानिक चाकणकर, कंपन्यांचे कर्मचारी या वाहतूक कोंडीला प्रचंड वैतागल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान, अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं.
गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला. जो अजितदादांना ही पटला. प्रत्येक काम तोलून-मापून पाहणाऱ्या अजित दादांना हे पटलं कसं काय?, असं म्हणत आंदोलकांनी तब्बल २५ हजार किमीचा मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत
-पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद
-‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती
-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध
-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड














