पुणे : हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद व शेत रस्ता योजनेअंतर्गत पाणंद व शेत रस्त्यांसाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेणे अनिवार्य केले आहे. या अभिनव निर्णयामुळे शेत रस्ते आणि पाणंद मार्गांच्या कामांना मोठा वेग मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, हवेली सभापतींनी मांडलेली ही संकल्पना आता राज्यभर राबवली जाणार आहे.
लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेत रस्ते आणि पाणंद रस्ते अतिक्रमणामुळे अडकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूकीसह दैनंदिन कामकाजात मोठा त्रास होत होता. युवराज काकडे यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेद्वारे या समस्येवर थेट तोडगा काढण्याची व्यवस्था केली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे कौतुक करताना म्हटले की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. हवेली पंचायत समितीने केलेला हा प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?
-अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत
-JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
-मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार














