पुणे : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीचा अजब तोडगा काढला आहे. पैशाचा अपव्यय आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध करायचे, पण उमेदवार मात्र लिलावातून ठरवायचे, असा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
प्रभागात सर्वसाधारण आणि महिला राखीव अशा दोन जागा होत्या. दोन्ही जागांसाठी इच्छुकांनी गावाच्या मंदिरात हजेरी लावली. गावकऱ्यांनी ठरवले की, जो सर्वाधिक बोली लावेल त्यालाच सर्वांचा पाठिंबा मिळेल आणि बाकी सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील. कोणीही विरोध न करता सर्वांनी या नियमाला मान्यता दिली.
सर्वसाधारण जागेची बोली सुरू झाली आणि अवघ्या काही मिनिटांत ९० लाखांवर पोहोचली. शेवटचे तीन उमेदवार रिंगणात राहिले. बोली ९७ लाख, नंतर एक कोटी आणि अखेर एक कोटी तीन लाख रुपये झाल्यावर सर्व थांबले. विजेता ठरला. त्याचप्रमाणे महिला राखीव जागेसाठीही बोली झाली आणि ती २२ लाख रुपयांवर स्थिरावली.
दोन्ही विजेत्या उमेदवारांना गावकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. इतर सर्व इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे राजगुरुनगर नगरपरिषदेचा हा प्रभाग पूर्णपणे बिनविरोध झाला. पैशाची लढाई रिंगणातच संपवून गावकऱ्यांनी निवडणुकीचा एक अनोखा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा
-यंदा स्वस्तात घराचं स्वप्न साकारण्याची शेवटची संधी, म्हाडानं दिली अर्जासाठी मुदतवाद
-‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश
-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली मतदार यादी, तुमचे नाव आहे का? चेक करा
-मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा














