पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला सहा जागा आल्याने पक्षात हालचालींना वेग आला आहे. या जागांसाठी इच्छुक नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून, पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. कोणाला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांनुसार सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधत उमेदवारांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील काही नावांची विशेष चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, संजय केणेकर, प्रज्ञा सातव आणि संदीप जोशी या संभाव्य उमेदवारांचा समावेश असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!














