पुणे : कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणातील वादळ आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून, तिला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना पुन्हा एकदा मुलाची बाजू घेतली.
विरोधकांनी केलेल्या आरोपानुसार, कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी झाली. एका वृत्तवाहिनीने ही बातमी उघड केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. सुरुवातीला अजित पवार यांनी हा व्यवहार झाल्याची माहिती नव्हती, तसेच दोन-चार महिन्यांपूर्वी चुकीचे करू नका असे सांगितल्याचे म्हटले होते. आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
“२००९ मध्येही ७० हजार कोटींचा आरोप झाला. १५ वर्ष उलटली तरी पुरावे कुणी दिले नाहीत. यातून आमची बदनामी होते. माध्यमांमध्ये प्रवक्ते आरोप करतात. चुकीचे झाले तर समजू शकतो, पण पुरावे नसताना सकाळपासून रात्रीपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे,” असे अजित पवार म्हणाले. पार्थ पवार कुठे आहेत, ते का बोलत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार म्हणाले, “त्याच्या बापाने भूमिका मांडली ना…”
‘एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो, हे आजपर्यंत मला कळले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने अशी नोंदणी का केली? चुकीचे काम का केले? हे चौकशीअंती आपल्याला कळेल? निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरू होतात’, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…
-‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं
-कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?
-पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?
-“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?














